
दुर्दैवी अंत!
गुलशन कुमार हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच त्यांच्या सामाजिक कामांमुळेही चर्चेत होते. त्यांनी वैष्णोदेवी येथे भंडारा सुरू केला होता, ज्याद्वारे आजही तेथे येणाऱ्या भाविकांना व यात्रेकरूंना मोफत भोजन दिले जाते. पण, अतिशय उदार असलेल्या गुलशन कुमार यांचा मृत्यू अत्यंत क्लेशदायक होता. मुंबई अंडरवर्ल्डच्या लोकांनी त्याच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला होता. पण, गुलशन कुमार यांनी त्यांच्या मागण्यांना थेट नकार दिला. त्यामुळे १२ ऑगस्ट १९९७ रोजी मुंबईतील एका मंदिराबाहेर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती.








