चैतन्यसोबत साक्षीही पोहोचली अर्जुन-सायलीच्या घरात! ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये होणार मोठा राडा!

0
15
चैतन्यसोबत साक्षीही पोहोचली अर्जुन-सायलीच्या घरात! ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये होणार मोठा राडा!


चैतन्य अर्जुनला सुनावणार!

तर, अर्जुन मात्र चैतन्यला खूप समजावण्याचा प्रयत्न करणार आहे. ‘मला तुला काहीतरी खूप महत्त्वाचं सांगायचं आहे, जे मी फक्त तुला एकट्याला सांगू शकतो’, असं म्हणत तो चैतन्याकडे विनवणी करणार आहे. मात्र, चैतन्य अर्जुनचं काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही. साक्षीबद्दल बोलत असल्यामुळे आता तो अर्जुनवरच चिडणार असून, तुला सांगायचं असेल तर सांग नाहीतर, नको सांगू असं म्हणून साक्षीला घेऊन तिथून निघून जाणार आहे. तर, चैतन्यच्या या वागण्यामुळे अर्जुनला देखील धक्का बसला आहे. आता आपल्या मित्राला साक्षीच्या तावडीतून कसं वाचवायचं, यासाठी दुसरी शक्कल लढवण्याचा प्रयत्न अर्जुन करणार आहे. मालिकेच्या येत्या भागात हा राडा बघायला मिळणार आहे.



Source link