
अखेर चैतन्यला सत्य कळणार!
तर, अर्जुन आणि सायलीला आपल्या साखरपुड्यात आलेलं पाहून चैतन्य खुशमखुश होणार आहे. एकीकडे सोहळा सुरू असताना, आता अर्जुन आणि सायली चैतन्यला एकट्यात गाठून सगळं सत्य पुराव्यानिशी त्याच्या समोर मांडणार आहे. तर, समोर आलेलं हे धक्कादायक सत्य पाहून चैतन्य देखील हादरून जाणार आहे. चैतन्य साक्षीसोबत हा साखरपुडा मोडायला निघणार इतक्यातच अर्जुन आणि सायली त्याला थांबवून साक्षीचा संपूर्ण खेळ समजवणार आहेत. हा खेळ सुरू साक्षीने केला होता, मात्र याचा शेवट आपण तिघं मिळून करणार असा निर्धार सायली, अर्जुन आणि चैतन्य यांनी केला आहे. मालिकेच्या येत्या भागांमध्ये या तिघांचा पुढचा डाव प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.







