
३ – जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवणार –
शिवसेना नेते मनोहर जोशी मुख्यमंत्री होते तेव्हा पाच वर्षांत पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवले होते, महागाई वाढू दिली नव्हती. आज मी जाहीर करतोय, महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पुढची पाच वर्षे डाळ, तेल, साखर, तांदूळ यासारखे जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवून दाखवणार. सरकारही स्थिर आणि भावही स्थिर, असं उद्धव ठाकरे म्हणाले.





