
वाढत चाललेली महागाई, बेरोजगारीची समस्या, नीट पेपरफुटीचे प्रकरण, महिलांची सुरक्षा, खते, बि-बियाण्यांचा काळाबाजार, कर्जासाठी शेतकऱ्यांची होत असलेली अडवणूक याविरोधात राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी कॉंग्रेस पक्षातर्फे शुक्रवारी, २१ जून रोजी राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयांवर सकाळी ११ वाजता सरकारच्या प्रतिमेस चिखल लावून ‘चिखल फेको’ आंदोलन करून भाजपाप्रणित सरकारचा निषेध करण्यात येणार आहे.
ट्रेंडिंग न्यूज







