
मृत्यू कधी, कोणाला व कसा येईल याचा काहीच भरवसा नाही. आयुष्याच्या क्षण भंगूरतेचा प्रकार उत्तर प्रदेश राज्यातील बदायूं येथे घडला आहे. येथे आजारपणामुळे मोठ्या भावाचा मृत्यू झाला. त्यानंतर लहान भाऊ पिंपळाच्या झाडाखाली बसून रजत होता. त्यावेळी अचानक पिंपळाची फांदी खाली पडून त्यांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी दोन भावांचा मृत्यू झाल्याने कुटूंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याचबरोबर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.







