
घर बनण्यापूर्वीच संसार उजाडला –
महाराजगंज जिल्यातील निचलौल ब्लॉकमधील १०८ गावात आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये २३५० लाभार्थ्यांना लाभ दिला होता. यामधील जवळपास ९० टक्के हून अधिक लाभार्थ्यांचे घराचे बांधकाम पूर्ण झाले आहे. दरम्यान लाभार्थ्यांमध्ये महिलांचाही समावेश आहे. ब्लॉकमधील ठूठीबारी, शीतलापूर, चटिया, रामनगर, बकुलडिहा, खेसहरा, किशुनपूर आणि मेधौली गावातील ११ महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पहिला हफ्ता ४० हजार रुपये जमा झाल्यानंतर सर्व ११ महिला पैसे घेऊन पतींना सोडून आपल्या प्रियकरांसोबत पळून गेल्या आहेत. या घटनेनंतर पीडित पती तनावात आहेत व सरकारी कार्यालयांत हेलपाटे मारत आहेत. पतींना आशा होती की, पीएम आवास योजनेच्या माध्यमातून त्यांच्या घराचे स्वप्न साकार होईल, मात्र त्यांचा संसारच मोडला आहे.








