अर्जुननेही सायलीसाठी धरला वट पौर्णिमेचा निर्जळी उपवास! ‘ठरलं तर मग’मध्ये बांधली जाईल का साताजान्माची गाठ?

0
22
अर्जुननेही सायलीसाठी धरला वट पौर्णिमेचा निर्जळी उपवास! ‘ठरलं तर मग’मध्ये बांधली जाईल का साताजान्माची गाठ?


‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात वट पौर्णिमेची पूजा पाहायला मिळणार आहे. अर्जुनला सायलीसोबत पूजा करायची आहे. पण, तो स्वतःहून हे बोलू शकत नव्हता. त्यामुळे आता शक्कल लढवून अर्जुन गुरुजींना सगळ्यांसमोर तुम्ही मला आग्रह करा, असं सांगतात. ठरल्याप्रमाणे सायली पूजा करत असताना गुरुजी सगळ्यांसमोर अर्जुनलाही पूजा करण्याचा आग्रह करणार आहेत. गुरुजींनी असं बोलताच, अर्जुन तुम्ही आग्रह करताय म्हणून मी पूजा करतो, असं म्हणत पूजा करणार आहे. आता अर्जुन सायलीच्या बाजूला येऊन बसणार आहे. त्यावेळी सायली लाजणार आहे. यावर अर्जुन सायलीला म्हणतो की, आपण पूजा करुयात.



Source link