
सगळं काही ऐकल्यानंतर आता चैतन्य साक्षीशी साखरपुडा मोडण्याचा निर्णय घेणार आहे. मात्र, हा साखरपुडा मोडण्यापासून अर्जुन त्याला रोखणार आहे. हे नाटक साक्षीने सुरू केलं होतं, मात्र याचा शेवट आपण करणार, असं म्हणत सायली, चैतन्य आणि अर्जुन तिघेही नवा डाव रचणार आहे. तर, चैतन्यने अर्जुन बद्दलचा सगळा राग मनातून काढून टाकून, पुन्हा एकदा अर्जुनला आपल्या हृदयात जागा दिली आहे. याचाच अर्थ दोघांमधील भांडण मिटले असून, आता पुन्हा एकदा दोघे एक होऊन अन्यायाच्या विरोधात लढताना दिसणार आहेत.








