
लीलाला लागली अभिरामच्या नावाची हळद!
हळदीचे हे दृश्य पाहून गुरुजी देखील म्हणाले की, ‘काय हा योगायोग आहे, अभिरामच्या नावाची हळद श्वेताला लागणार होती. मात्र, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच आहे. अखेर अभिरामच्या नावाची हळद आता लीलालाच लागलेली आहे.’ हे ऐकल्यानंतर अभिरामचा पारा चांगला चढला होता. मात्र, अभिरामने काहीही बोलणं टाळलं. एकीकडे लीलाला आपली यात काही चुक नसल्याचे समजावत होती. तर, लक्ष्मी, दुर्गा आणि सरस्वती यांनी मात्र लीलावर चांगलंच तोंडसुख घेतलं. आता अभिराम काय निर्णय घेणार? कुणाशी लग्न करणार? हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.








