
Filmy Kissa Marathi : अभिनय क्षेत्र हे बेभरवशाचे असू शकते, हे अनेक कलाकारांच्या अनुभवावरून सिद्ध झाले आहे. काही कलाकारांना या क्षेत्रात यश मिळते, तर काहींना परतीचा मार्ग निवडावा लागतो. लॉकडाऊनच्या काळात अनेक कलाकारांनी आपले करिअर बदलले आणि शेतीकडे वळले. यातील सर्वात उल्लेखनीय उदाहरण म्हणजे अभिनेता राजेश कुमार. बिहारच्या छोट्या गावात जन्मलेला आणि मुंबईतील चंदेरी दुनियेत करिअर करण्यासाठी आलेला राजेश कुमार सध्या पालघरमध्ये सेंद्रिय शेती करत आहे.