
विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळाल्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल, गुरुवारी महायुती सरकारचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचे कॅबिनेटमधील सहकारी, एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि बॉलिवूड क्रिकेट क्षेत्रातील सेलेब्रिटींच्या उपस्थितीत फडणवीस यांचा शपथविधी सोहळा पार पडला. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतील नागरिकांना नव्या सरकारकडून अनेक अपेक्षा आहेत. तब्बल दोन कोटी लोकसंख्या असलेलं मुंबई शहर गेले अनेक वर्ष विविध समस्यांचा सामना करत आहे. गोरगरिब, झोपडपट्टीधारकांपासून अब्जाधीशांची निवासस्थाने असलेल्या मुंबई शहराता गेल्या काही वर्षात विकासकामे झाली. त्यात नवीन मेट्रो मार्ग, कोस्टल रोड, अटल सेतू आणि गोरेगाव-मुलुंड लिंक रोडमुळे काही प्रमाणात मुंबईकरांच्या वाहतुकीच्या समस्या सुटल्या. तरी या शहरात पायाभूत सुविधा, वाहतूक आणि सार्वजनिक सेवेचे प्रश्न अजून जसेच्या तसे आहेत. आता राज्यात नवे सरकार आले आहे. मुंबईकरांना नव्या सरकारकडून फार अपेक्षा आहेत. मात्र खालील पाच गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.