हवामान विभागाच्या अंदाजानुसाार, कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा येथे पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. याशिवाय, मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांसह पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला. त्यामुळे मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. राज्यात येत्या ४ ऑगस्टपर्यंत हा पाऊस कायम राहणार आहे. तर, ५ ऑगस्टपासून कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होऊ शकतो, असाही अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.