
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर आणि दक्षिण भारताकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे राज्यातील तापमानात वाढ झाल्याचे पाहायला मिळते. विदर्भ, मराठवाडा, उत्तर- मध्य महाराष्ट्र या भागात तीव्र उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. जळगाव, मालेगाव, बीड, जालना, नांदेड, परभणी, यवतमाळ, लातूर, धाराशिव, सोलापूर, नागपूर, वर्धा, बुलढाणा, ब्रह्मपुरी, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, यांसह बहतांश जिल्ह्यातील तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा आकडा गाठला आहे.





