
चार तासांत तीन भूस्खलन; झोपेत काळाने घातला घाला
अधिकाऱ्यांनी सांगितले की, वायनाड जिल्ह्याच्या डोंगराळ भागात रात्री २ भूस्खलन सुरू झाले. सकाळी सहा वाजेपर्यंत दरड कोसळण्याच्या तीन घटनांची नोंद झाली आहे. या भूस्खलनाचा चार गावांना फटका बसला आहे. लोक झोपले होते, त्यामुळे त्यांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. भूस्खलनामुळे अनेक घरे मातीच्या ढीगाऱ्यात दाबली गेली. तर वाहने वाहून गेली. येथील जलाशय पाण्याने तुडुंब भरले आहेत. तर झाडे उन्मळून पडली आहेत. प्रभावित भागात मुंडक्काई, चुरलमला, अट्टामला आणि नूलपुझा गावांचा समावेश आहे. आतापर्यंत ३४ मृतांची ओळख पटली आहे. त्यापैकी १८ जणांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आले आहेत.







