
केरळमधील वायनाड जिल्ह्यात झालेल्या भुस्खलनामुळे मोठी जिवीतहानी झाली आहे. मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे वायनाडमधील मेपाड्डी, मुंडक्कल आणि चूरलमाला परिसरामधील अनेक घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. दरम्यान, या दुर्घटनेतील मृतांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. वायनाड भूस्खलन दुर्घटनेतील मृतांचा आकडा मंगळवारी सायंकाळी १२३ वर पोहोचला.






