
Vijay Wadettiwar Slams Maharashtra Government: परदेशात गेलेल्या ५० ओबीसी विद्यार्थ्यांची स्कॉलरशीप रखडल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सरकार इतर मागास बहुजन कल्याण विभाग जाहिरातीसाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद करतो. पण विद्यार्थ्यांना पैसे देत नाही, यासारखे दुर्दैव नाही, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला. सरकारने या विद्यार्थ्यांना तातडीने पैसे पाठवून न्याय द्यावा, अशीही मागणी केली आहे.






