
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बालने २३ जून रोजी लग्नगाठ बांधली. जवळपास सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केल्याचे समोर आले आहे. सध्या सोनाक्षी आणि जहीर दोघेही हनीमूनला गेले आहेत. त्यांचे तेथील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामधील एका फोटोमध्ये जहीर सोनाक्षीवर ओरडणार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्या दोघांमध्ये भांडण झाल्याची चर्चा सुरु आहे.








