
तत्पूर्वी दिल्लीच्या सीमांवर गेल्या काही दिवसांपासून ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी बळाचा वापर करून शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमांवरच रोखलं. दरम्यान,आज दुपारी पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी दिल्लीकडे मार्गस्थ होण्याचा प्रयत्न केला. परंतु,पोलिसांनी शेतकऱ्यांवर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. पोलिसांनी ड्रोनद्वारे अश्रूधुराचा मारा केला. अश्रूधुराच्या माऱ्यानंतर शंभू सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. आंदोलक शेतकरी सैरावैरा धावू लागले. तर या सीमेवर अधिक पोलीस फौजफाटा मागवण्यात आला आहे.