
दरम्यान नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या तीन दिवसात विदर्भातील ११ जिल्हे कोरडे राहतील. तीन दिवस विदर्भात पाऊस पडणार नाही. ४ एप्रिल रोजी अकोला, यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ५ एप्रिल रोजी चंद्रपूर व अकोला जिल्ह्यातील काही ठिकाणी उष्णतेची लाट जाणवेल. येत्या तीन दिवसात किमान तापमान २३ ते २६ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान २९ ते ४३ अंश सेल्सिअर राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढणार असून अन्य कोणतेही बदल होणार नसल्याचे हवमान विभागाने सांगितले आहे.



