
varandha ghat closed : रायगड जिल्हा हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ वरील वरंधा घाट हा प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ३० मे पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहे. या काळात रस्त्याचे दुपदरीकरण, संरक्षण भिंत बांधण्याचे व आवश्यक सुरक्षा उपाय योजना करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे ८ एप्रिल ते ३० मे पर्यंत हा घाट रस्ता सर्व प्रकारच्या अवजड व लहान मोठ्या वाहनांसाठी बंद ठेवण्याचे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे.



