
मुंबई आणि अहमदाबाद (Mumbai Ahmedabad corridor) दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी खुशखबर आहे. पश्चिम रेल्वेच्या या मार्गावर वेगवान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे (Vande bharat express train) ट्रायल केले जात आहे. यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्त (CRS)कडून हिरवा झेंडा दाखवला आहे. वंदे भारत ट्रेन्स आपली गती व चांगल्या सुविधांसाठी ओळखली जाते. सध्या या ट्रेनची गती १३० किमी प्रति तास आहे, ती वाढवून १६० किलोमीटर प्रति तास करण्याची तयारी आहे. जर ही ट्रायल यशस्वी झाली तर प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. मुंबई आणि अहमदाबाद मार्गावरील प्रवासात जवळपास ४५ मिनिटांची बचत होणार आहे. सध्या हे अंतर पार करण्यासाठी जवळपास ५ तास २५ मिनिटांचा वेळ लागतो.