
देशात अनेक मार्गावर वंदे भारत ट्रेन धावत आहेत. त्याचबरोबर अनेक शहरांदरम्यान वंदे भारत रेल्वे सुरू केल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीशनिवारी (३० डिसेंबर) अयोध्या दौऱ्यावर येणार असून सहा नव्या वंदे भारत ट्रेन्सना हिरवा झेंडा दाखवला जाईल. अयोध्या ते आनंद विहार टर्मिनल, त्याचबरोबरमाता वैष्णो देवी कटराते नवी दिल्ली,अमृतसर ते दिल्ली, कोईमतूर ते बेंगळुरू केंट, मंगळुरू ते मडगाव आणि जालना ते मुंबई दरम्यान वंदे भारत रेल्वे सुरू होणार आहे. मात्र महाराष्ट्रातून सुरू होत असलेल्या जालना-मुंबई वंदे भारत रेल्वे उद्घाटनावरून राजकीय वाद उद्भवला आहे.







