
वंदे भारतच्या माध्यमातून चीनला टेन्शन देण्याचे नियोजन –
द टेलीग्राफच्या रिपोर्टमध्ये नॉर्थईस्ट फ्रंटियर रेल्वेच्या सूत्राच्या हवाल्याने म्हटले आहे की, केंद्र सरकार भारत-चीन सीमेवरील नाथू-ला पर्यंत रेल लिंक बनवणार आहे. सेवोके-रंगपो विभागात यावर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत रेल्वे धावणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिक्किम भौगोलिक दृष्ट्या महत्वपूर्ण आहे. त्यामुळे अरुणाचल प्रदेश आणि लडाखप्रमाणे या राज्यातील रेल्वे कनेक्टिविटी सुधारण्यावर सरकारचा भर आहे. एका अन्य रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, जर सिक्किममध्ये वंदे भारत ट्रेन सुरू झाली तर ५ तासात गुवाहाटीला पोहोचणे शक्य आहे. जे येथील लोकांसाठी गेम-चेंजर ठरेल.







