
२०२३ च्या विश्वचषकादरम्यान गुडघ्याच्या दुखापतीनं ग्रस्त असलेला हार्दिक आता सावरला आहे. मात्र, मुंबईचा कर्णधार म्हणून त्याच्या निवडीला फ्रँचायझीच्या चाहत्यांकडून मोठा विरोध झाला होता. कर्णधार म्हणून या अष्टपैलू खेळाडूची सुरुवात खडतर होती कारण एमआयला सलग तीन पराभवांना सामोरं जावं लागलं. मात्र, गेल्या आठवड्यात दिल्ली कॅपिटल्सचा २९ धावांनी पराभव करून मुंबईनं पहिला विजय नोंदवला.



