
प्रेमात पडणं पडलं महागात!
पण, राम गोपाल वर्माच्या प्रेमात पडणंही उर्मिलाला चांगलंच महागात पडलं. त्यांच्या नात्याच्या बातम्या सर्वत्र येऊ लागल्या. एकीकडे राम गोपाल वर्मामुळे उर्मिलाची कारकीर्द खूप उंचीवर पोहोचली, तर दुसरीकडे तिच्या फिल्मी करिअरच्या घसरणीचे कारणही राम गोपाल वर्माच ठरले. राम गोपाल वर्मासोबत काम केल्यामुळे अनेक दिग्दर्शकांनी उर्मिलाला चित्रपटात कास्ट करण्यास नकार दिला होता. कारण राम गोपाल वर्मा यांच्यासोबत इंडस्ट्रीतील अनेकांचे राम गोपाल वर्मासोबत वाद होते. तर, दुसरीकडे या अफ़ेअरबद्द्ल कळताच राम गोपाल वर्मची पत्नी चिडली आणि तिने उर्मिलाच्या कानशिलात लगावली. त्यानंतर उर्मिलाला कोणताच आधार मिळू शकला नाही. चित्रपट न मिळाल्याने उर्मिलाचे संपूर्ण फिल्मी करिअर उद्ध्वस्त झाले आणि ती अचानक इंडस्ट्रीतून गायब झाली. इंडस्ट्रीपासून दूर राहिल्यानंतर, वयाच्या ४२व्या वर्षी अभिनेत्रीने तिच्यापेक्षा १० वर्षांनी लहान असलेल्या मोहसिन अख्तर मीरशी लग्न केले.







