
हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आता पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागात पावसाने आज हजेरी लावली. या अवकाळी पाऊसामुळे रब्बी हंगामाचे मोठे नुकसान झाले आहे. वर्धा, अमरावती, गोंदिया, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.






