
या भेटीनंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, ठाकरे कुटुंब आणि छत्रपती घराण्याचे ऋणानुबंध माझ्या आजोबांपासून आहेत. ते ऋणानुबंध या पिढीतही आणि पुढील पिढीतही कायम राहतील. कोल्हापुरातून शाहू महाराजांची उमेदवारी महाविकास आघाडीतून निश्चित झाली आहे. शिवसैनिकांनी ठरवलं आहे की, पूर्ण ताकदीने महाराजांना विजयी केल्याशिवाय राहणार नाहीत.हे वचन मी त्यांना दिलं आहे. कारण हा महाराष्ट्राच्या आणि मराठीच्या अस्मितेचा प्रश्न आहे. मी प्रचाराला तर येणारच आहे, पण विजयी सभेलाही येणार आहे.





