
धारावीकरांना उचलून मिठागरात टाकायचं आणि धारावीत उपऱ्यांची वस्ती बसवून सगळा पैसा अदानीच्या खिशात घालण्याचा कट आहे. मात्र यात धारावीकरांनी काय पाप केलंय, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. माझ्या धारावीकरांना हक्काचे घर मिळाले पाहिजे. ही आमची पहिली मागणी आहे. धारावीकर येथून कोठेही जाणार नाहीत. धारावीकरांना विकास पाहिजे आणि तो येथेच पाहिजे. तुम्हाला हे सोपे वाटत असेल की, घरे बांधेपर्यंत मिठागरात जागा दिली. पण एकदा का तुम्ही मिठागरात गेला की,परत तुम्हाला धारावी दिसणार नाही.





