
आरोप करताय तर त्याला जागा!
एखाद्यावर आरोप करत असाल तर त्यांना जागा. केवळ घाबरवून त्याला आपल्या पक्षात आणण्यासाठी त्याची बदनामी करू नका, असं उद्धव ठाकरे म्हणाले. ‘संजय राऊत, अनिल परब यांना विनाकारण छळलं जात आहे. कशासाठी चाललंय हे सगळं? तुम्ही म्हणाल तो संत, तुम्हाला वाटेल तो डाकू, तुम्ही कराल तो देव. मग तुम्ही कोण?,’ असा मार्मिक सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.





