Uddhav Thackeray: दोन ठग महाराष्ट्र लुटत आहेत; त्यांना खांदा देण्याची वेळ आलीय, उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

0
2
Uddhav Thackeray: दोन ठग महाराष्ट्र लुटत आहेत; त्यांना खांदा देण्याची वेळ आलीय, उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल


याआधी मराठी वगुजराती असा वाद कधीच नव्हता. यापुढेही तो होऊ नये अशी आमची इच्छा आहे. पण दोन गुजराती ठग तिकडे बसले आहेत. त्यांनी मुंबईतच नव्हे तर गुजरात आणि देश अशी भिंत तयार केली आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सुरत लुटली होती. आता हे दोन ठग छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र लुटत आहेत, अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर केली. मुंबईत दादर येथील शिवाजी मंदिर येथे राज्यव्यापी वज्र निर्धार परिषदेत बोलताना त्यांनी भाजप व मोदीवर जोरदार निशाणा साधला.



Source link