
भ्रष्टाचारी भाजपमध्ये आला हा भाजपलाच धक्का महाआघाडीला नाही –
अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशावर उद्धव ठाकरे म्हणाले की, अवकाळीचा फटका, दुष्काळात शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याऐवजी अशोक चव्हाण मोदीच्या दारात गेले आहेत. आज एक भ्रष्टाचारी भाजपमध्ये आला हा भाजपलाच धक्का आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीला नाही. शिवसेनेला तर अजिबात नाही, कारण असले अनेक धक्के आम्ही पचवले आहेत. सडलेले पान झडल्यानंतर नवे कोंब फुटतात.उपरे आपल्या पक्षात घेणं, ही सूज आहे. भाजप सत्तेच्या मस्तीने सुजलाय. भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि खासदारकी, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्रीपद द्यायचे हीच मोदी गॅरंटी आहे का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला.