
उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांच्या गुन्ह्यांचा पाढाच वाचला!
‘गेल्या वर्षी गणपतीच्या मिरवणुकीत एका आमदारानं गोळीबार केला होता. त्याच्यावर कारवाई झाली नाही. दहिसरच्या जवळच्याच एका आमदाराच्या मुलानं बिल्डरच्या मुलाचं अपहरण केलं होतं. त्याच्यावर कारवाई नाही. ठाण्यात एका तरुणीवर हल्ला झाला होता, तो भाजपचा कार्यकर्ता होता, त्याच्यावर कारवाई झाली नाही. काल पुण्यात निखिल वागळे, विश्वंबर चौधरी व असीम सरोदे यांच्यावर हल्ला झाला. तो काही अचानक झाला नव्हता. भाजपच्या गुंडांनी धमकी दिली होती. पोलिसांनी काही कारवाई केली नाही, याची आठवणही उद्धव यांनी दिली.





