
मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला शुक्रवारी हिंसक वळण लागले. यात ३८ पोलिस कर्मचाऱ्यांसह अनेक जण जखमी झाले. अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. अंबड तालुक्यातील धुळे-सोलापूर रस्त्यावरील अंतरवली सारथी गावात हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यावेळी पोलिसांनी हवेत गोळीबार केल्याचा दावाही गावकऱ्यांनी केला. मात्र, अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला नाही. दरम्यान, तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याने त्यांनीच गोळीबाराचे आदेश दिल्याची चर्चा सुरु आहे.






