
श्रेयस आणि अश्विनीला त्यांच्या कुटुंबासकट घराबाहेर काढता यावं, म्हणून शिल्पीने फार मोठा डाव रचला होता. या कटाचा भाग म्हणून शिल्पीने आपला बहरलेला संसार देखील मोडला. विद्युतसोबत घटस्फोट घेतला तर, आपण भविष्यातील तरतूद म्हणून राहतं घर स्वतःच्या नावावर करून घेऊ. इतकंच नाही तर, घर नावावर झालं की, याच घरातून श्रेयस आणि अश्विनीला धक्के मारून बाहेर काढून, असा विचार शिल्पीने केला होता. याच योजनेप्रमाणे तिने विद्युतला घटस्फोट दिला. मात्र, विद्युतसोबत नातं तुटल्यानंतर त्यांचा मुलगा संजू याचा ताबासुद्धा विद्युतकडेच गेला.







