
घटस्फोट घेतल्यानंतरही विद्युतचे शिल्पीवरील प्रेम अजिबातही कमी झालेले नाही. तो सतत तिला पुन्हा एकत्र राहण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, शिल्पी यासाठी नकार देताना दिसत आहे. शिल्पी परत येणार नाहीच हा तिचा निर्णय झाल्याचे समजून, आता विद्युतने दुसरे लग्न करून संसार थाटावा यासाठी त्याची बहीण म्हणजेच अश्विनी आग्रह करणार आहे. बहिणीचे बोल आता विद्युतला देखील पटणार असून, तो दुसऱ्या लग्नासाठी तयार होणार आहे. मात्र, त्याचवेळी शिल्पी दोघांनाही एक मोठा धक्का देणार आहे.








