
अश्विनी स्पर्धेत उतरू नये आणि उतरलीच तर, ती जिंकू नये यासाठी शिल्पीने अनेक प्रयत्न केले. मात्र, तिचे सगळेच डाव नेहमी फोल ठरले. प्रत्येक वेळी आपल्या पत्नीची म्हणजेच अश्विनीची साथ न देता, श्रेयसने नेहमीच आपल्या बहिणीची शिल्पीची बाजू घेतली. याचाच फायदा शिल्पीने घेतला होता. तिने नेहमीच श्रेयसचा वापर करून अश्विनीला अडकवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता शिल्पीचा खरा चेहरा श्रेयसच्या समोर आला आहे. त्यामुळे त्याने आता अश्विनीची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.






