
अश्विनीला त्रास देण्यासाठी शिल्पी सतत नवनवे डाव रचताना दिसत आहे. अश्विनी घरी नसल्याचा फायदा घेत शिल्पीने प्रतीकवर दबाव आणून आणि मयुरीला जीवे मारण्याची धमकी देवून तिने आपला डाव सफल करण्याची योजना आखली होती. यासाठी तिने पप्रतीकला अगदी हतबल केलं. मात्र, काहीही झालं तरी आपण मयुरीला त्रास देणार नाही आणि तिला फसवणार देखील नाही, हे ठरवलेल्या प्रतीकने शिल्पीच्या डावात सामील होण्यास सरळ नकार दिला. प्रतीकचा नकार ऐकून शिल्पी मात्र संतापली आहे. याचाच बदल म्हणून तिने आता प्रतीक विरोधात डाव रचत त्यालाच सगळ्या प्रकरणात अडकवले आहे.