
ठरलं तर मग
‘ठरलं तर मग’ या मालिकेने २४व्या आठवड्यातही ६.९चा टीआरपी मिळवून पहिलं स्थान कायम राखलं आहे. ‘ठरलं तर मग’ या मालिकेमध्ये सध्या अतिशय रंजक वळण पाहायला मिळत आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले होते. अगदी सुरुवातीपासूनच ही मालिका पहिले स्थान टिकवून आहे. सध्या या मालिकेत अर्जुन अन्यायाविरुद्ध लढताना दिसत आहे. तर सायली देखील त्याची साथ देताना दिसत आहे. सत्याच्या या लढाईत कुणाचा विजय होणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे.







