
फलटण: माळशिरस तालुक्यातील तांबवे गावातील अक्कासाहेब मंगल बाळासाहेब भोसले यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रम २७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता मंगल विहार, तांबवे येथे आयोजित केला जात आहे.
या कार्यक्रमात अक्कासाहेबांच्या कार्य, विचार आणि योगदानाचे स्मरण करण्यात येईल. सर्व ग्रामस्थ, नातेवाईक आणि अनुयायी यांची उपस्थिती प्रार्थनिय
तुझ्याशिवाय उणे सर्व काही
कशी विसरू तुला, तेच कळत नाही,
अक्का, तुझ्याशिवाय उणे वाटते सर्व काही।
हॉर्न ऐकताच, गाडीचा दारातच उभी असायची,
आम्हा सर्वांचे तू हसूनच स्वागत करायची।
खूप भारी वाटायचे आनंद, खूप व्हायचा,
तुझा चेहरा मात्र समाधानाने फुलून जायचा।
खूप कौतुक नातवांचे, लाड खूप करायची,
जवळ बसवून सर्वांचे लाडाने पापा घ्यायची।
यावेसे परतून माघारी, पुन्हा समोर दिसावी,
घालावे मायेचे पांघरूण, प्रेमाची सावली असावी।
जाता तांबवेला कथी, घरात थांबू वाटत नाही,
शोधते नजर, घरभर तुझाच चेहरा नेत्र पाहि।
घरभर तुझी आठवण, स्पर्श प्रत्येक वस्तूला,
स्मरण कायम जपनेस प्रत्येक नात्याला।
मारावी मिठी तुला, तुझा स्पर्श व्हावा,
सुंदर तुझा चेहरा आम्हास पुन्हा दिसावा।
प्रत्यक्ष पहायची सवय, फोटोत पहावत नाही,
तुझ्या आठवणीशिवाय एक क्षणही जात नाही।
किती जागल्या रात्री, कायम तुझ्या आठवणीत,
अक्का, खूप आनंद होईल प्रत्यक्ष आपल्या भेटीत।
अशिक्षित पण ज्ञानाची धुरी
अक्का, तू अशिक्षित असूनही,
शिक्षणाची भारी आवड, बाबासाहेबांच्या विचारांची आयुष्यभर निवड।
छोटा मोबाईल पण अचूक तू हाताळायची,
विविध चित्रावरून फोन बरोबर लावायची।
सद्विचाराची पेरणी आयुष्यभर केली,
देऊन मुलांना शिक्षण, स्वप्नं पूर्ण झाली।
व्यक्तिमत्व होते अलग, गाव सर्व अक्का म्हणे विचारपूस करी,
सर्वांची आता नव्हते काही उणे।
नातीगोती, मैत्रिणी जीवापाड जपले,
सर्वांच्या मनात मात्र माणुसकी बिंबले।
शरीराने होती अशक्त, खूप खंबीर,
मनाने आधार द्यायची भक्कम, तुझ्या ज्ञानाने चकीत।
ज्ञान, माहिती घ्यायची भारी तुला आवड,
टीव्ही, युट्यूब पाहण्या आवर्जून काढे सवड।
लावला तू खूप लळा पदोपदी होई,
आठवण प्रत्येक प्रसंग स्मरणात, नयनात अश्रूची साणवण।
आक्का तुला शोधू कुठे
अक्का, तुला शोधू कुठे, असह्य वेदना हृदयाला,
सांग का? सोडून गेलीस आम्हा सर्व लेकराला।
किती माया प्रेम दिले तुझ्या,
अशा जाण्याने आम्हाला पोरके केले, काय करावे जीवाने।
अथांग मायेचा सागर होता तुझ्या हृदयात,
काय करावे, कुठे जावे, आठवण क्षणाक्षणात।
सदैव हसरा चेहरा, आयुष्याची तक्रार नाही,
पप्पांना खंबीरपणे साथ, आता उणे नव्हते काही।
सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण केल्या मोहनदादाने,
आशिष, आकांक्षा, मैत्रेय, टिम्मीची वाट पहायची आतुरतेने।
अवका, तू हवी होतीस आयुष्यभर साथ देताना,
मुलांचे आणि नातवंडांचे कोडकौतुक पाहताना।
जावई लाभले, मुलासम केली आक्कासाहेबांची सेवा भरभरून दिले,
तू आशिष, तुझा चेहरा सदैव दिसावा।
– सौ. मनिषा बाबासाहेब वाघमारे
साहस टाइम्सकडून अक्कासाहेबांना विनम्र अभिवादन 🙏




