
दोन भावांच्या भांडणातून हे घर बांधले गेल्याचे बोलले जाते. दोन्ही भावांना वडिलांच्या मालमत्तेतून जमीन मिळाली होती. दोघांनी जमीनीची वाटणी केली. अनेक वर्षांनंतर त्या ठिकाणी सरकारी प्रकल्पांतर्गत रस्ता तयार होणार होता. एका भावाने या योजनेसाठी जमीन सरकारला देण्याचे मान्य केले. परंतु, दुसऱ्या भावाने कोणत्याही किंमतीला जमीन देण्यास नकार दिला. आपल्या भावाने ही जमीन सरकारला देण्याऐवजी स्वतःकडेच ठेवावी, अशी त्याची इच्छा होती. परंतु, मात्र तरीही त्याच्या भावाने आपली जमीन सरकारला दिली. यामुळे एक भाऊ संतापला. त्याने रागाच्या भरात अरुंद जागेत घर बांधले, जेणेकरुन दुसऱ्या भावाला समुद्राचे दृश्य पाहता येणार नाही.








