
जोखीम लक्षात घेऊन भारतीय रिझर्व्ह बँकेने किरकोळ कर्जाची चौकशी वाढवली आहे. याशिवाय टॉप-अप गृहकर्जही तपासाच्या कक्षेत घेण्यात आले आहे.
मुंबई : जोखीम लक्षात घेऊन भारतीय रिझर्व्ह बँकेने किरकोळ कर्जाची चौकशी वाढवली आहे. याशिवाय टॉप-अप गृहकर्जही तपासाच्या कक्षेत घेण्यात आले आहे. या प्रकरणाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किरकोळ कर्जात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने आर्थिक व्यवस्थेत धोका वाढू शकतो. हे थांबवण्यासाठी तपासाचा विस्तार करण्यात आला आहे.
आरबीआयने बँका आणि एनबीएफसीद्वारे अशा कर्जावर करडी नजर ठेवली आहे. पर्सनल लोन देणाऱ्या संस्थांना जेथे धोका वाढत आहे, अशा कर्जांना आळा घालण्यास सांगितले आहे. बँका आणि बिगर बँक वित्तीय कंपन्यांच्या काही किरकोळ कर्जाला लगाम घालण्यासाठी आरबीआयने सहा महिन्यांत अनेक पावले उचलली आहेत. यामध्ये त्यांना ताकीदही देण्यात आली आहे.










