
आत्महत्या करण्यापूर्वी तिर्थानंद फेसबुकवर लाइव्ह आला होता. त्यावेळी त्याने एक महिला सतत धमकी देत असल्याने इतके टोकाचे पाऊल उचलत असल्याचे सांगितले. ‘काही महिन्यांपूर्वी माझी एका महिलेशी ओळख झाली. हळूहळू आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. आम्ही रिलेशनशीपमध्ये होतो आणि लिव्ह इनमध्ये राहू लागलो. काही दिवसांनी मला कळाले की ती प्रॉस्टीट्यूट आहे. मी कसंबसं या सगळ्यातून बाहेर पडलो. मात्र, ती मला धकम्या देऊ लागली. तिने माझ्यावर केस केली आहे. या केसमुळे मी स्वत:च्या घरापासून पळत आहे. फुटपाथवर झोपावे लागत आहे. त्यामुळे मी स्वत:ला संपवत आहे’ असे तिर्थानंद म्हणाला होता.