
अभिषेक अजय घाणेकर (वय २५, रा. पुलाच्या वाडी डेक्कन), आकाश विनायक माने (वय २१, रा. पूलाची वाडी डेक्कन, शिवा जिदबहादुर परिहार (वय १८, नेपाळी कामगार) अशी मृत्यूमुखी पडलेल्या तिघांची नावे आहेत. पुण्यात मंगळवारपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे खकडवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले असून यामुळे मुठा नदीला मोठा पुर आला आहे. काल रात्री मोठा पाऊस आल्याने तिघांनी त्यांची अंडा भुर्जीची गाडी बंद करून घरी निघून गेले होते. दरम्यान, पहाटे ३ वाजता पाणी वाढल्याने ही गाडी सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी ते तिघेही पुन्हा गाडीवर गेले. यावेळी तेथे गुढघाभर पाणी साचले होते. यावेळी अचानक त्यांना विजेचा शॉक बसला. यामुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला.