
सगळं काही नीट होईल, असं समजवण्याचा प्रयत्न अर्जुन करतो. मात्र, सायली आपल्या हट्टावर अडूनच आहे. आता जर सायलीने आपल्यासा पतीसाठी म्हणजेच अर्जुनसाठी उपवास केला नाही, तर पूर्णा आजी आणि आईसमोर सगळं सत्य येईल याची धास्ती अर्जुनला वाटत आहे. तर, दुसरीकडे सायलीने दोन्ही दिवस काहीचं खाल्लं नाही तर, तिची तब्येत खराब होईल, तिला चक्कर येईल, अशी काळजी देखील अर्जुनला वाटत आहे. आता सायली नेमका काय निर्णय घेणार यावर अर्जुन आणि तिच्या नात्याचं भविष्य ठरणार आहे.








