
‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात अर्जुन सायलीला शोधण्यासाठी घराबाहेर पडताना दिसणार आहे सायली आपल्याजवळ हवी म्हणून मधुभाऊंची केस लांबणीवर टाकण्याचा चैतन्य आणि अर्जुनचा प्लॅन सायलीने ऐकला होता. मात्र, यामुळे तिचा मोठा गैरसमज झाला आहे. सायलीला आता असं वाटत आहे की, मधुभाऊ तुरुंगातून सुटू शकतात. मात्र, अर्जुन सरांनी त्यांना मुद्दामच तिकडे अडकवून ठेवले आहे. यामुळे चिडलेली सायली आता मधुभाऊंना भेटायला जाते, असं सांगून घरातून निघून जाणार आहे. बराच वेळ झाला तरी सायली घरी परतून आली नाही. त्यामुळे सायली कुठे गेली हे विचारण्यासाठी अर्जुन आता घरी पोहोचणार आहे.







