
प्रियाच्या आनंदाला उधाण!
दुसरीकडे, सुभेदारांच्या घरात असलेली प्रिया स्वतःच्या मनात वेगवेगळी चित्र तयार करून, आनंदी होत आहे. सायली घरात परत आलीच नाही, तर अर्जुनच्या आयुष्यात येण्याचा आपला मार्ग मोकळा होणार आहे, असं प्रियाला वाटत आहे. त्यामुळे ती मनातून आनंदून गेली आहे. तर, अर्जुनच्या आयुष्यात आपलं स्थान पक्कं होईल, शिवाय साक्षीकडून मिळणाऱ्या पैसा यामुळे आपण मालामाल होऊ आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, असे प्रियाला वाटत आहे. सायली गायब झाल्यानंतर आता प्रिया साक्षीला फोन करून, तिच्याकडे पैशाची मागणी करणार आहे. नागराज काही वेळापूर्वीच बोललेली गोष्ट इतक्यातच खरी झाल्याचे दिसल्याने, आता महिपत आणि साक्षी सायलीला मारण्याचा प्लॅन कॅन्सल करणार आहेत.






