
साक्षी आणि चैतन्य यांना एकत्र बघून आता अर्जुनला मोठा धक्का बसला आहे. साक्षी अर्जुनला त्रास देतेय की काय असं वाटून तो तिला दटावणार आहे. ‘तू इथे चैतन्यच्या घरात काय करत आहेस? आता तुझा काय इरादा आहे?’ अशा आशयाचे प्रश्न विचारू लागतो. मात्र, यावेळी चैतन्य त्याला रोखणार आहे. माझं आणि साक्षीचं एकमेकांवर प्रेम असून, आम्ही दोघे लवकरच लग्न करणार आहोत, असे चैतन्य अर्जुनला सांगणार आहे. हे ऐकून अर्जुनला धक्का बसणार आहे. ‘ही मुलगी चांगली नाही, ती तुझ्यावर प्रेम करत नाहीये. पैशांसाठी ही आणि हिचे वडील कोणत्याही थराला जाऊ शकतात’, असे अर्जुन चैतन्यला समजावणार आहे. मात्र, अर्जुनचे बोलणे न ऐकताच चैतन्य त्याला घरातून निघून जायला सांगणार आहे.








