
गणपती विसर्जन मिरवणुकीत सायलीवर जीवघेणा हल्ला घडवून आणला होता. या सगळ्यामागे प्रियाचा हात आहे. मात्र, तिने या सगळ्या गोष्टी भाडोत्री गुंडांकडून घडवून आणल्या आहेत. या हल्ल्यातून सायली थोडक्यात बचावली. अर्जुनच्या सावधपणामुळे सायलीच्या जीवावर आलेलं संकट थोडक्यात टळलं होतं. मात्र, या हल्ल्यात सायली गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. यातून तिचा जीव थोडक्यात बचावला. यावेळी अर्जुनसह सगळेच सायलीच्या जीवासाठी देवाचा धावा करत होते.






