Tharala Tar Mag: प्रियाची चोरी पकडण्यात चैतन्य आणि अर्जुनला मिळणार का यश? ‘ठरलं तर मग’मध्ये आज काय घडणार?

0
22
Tharala Tar Mag: प्रियाची चोरी पकडण्यात चैतन्य आणि अर्जुनला मिळणार का यश? ‘ठरलं तर मग’मध्ये आज काय घडणार?


चैतन्य मैत्रीला जागला!

एकीकडे अर्जुन या वागण्यामुळे वैतागला आहे. तर, दुसरीकडे सायली अर्जुनला बार काऊन्सिलने काय निर्णय दिला, हे विचारण्यासाठी फोन करत आहे. मात्र, वैतागलेला अर्जुन सायलीला आपण नंतर बोलू, असं बोलून तिचा फोनच ठेवून देणार आहे. अर्जुनला होत असलेला हा त्रास बघून चैतन्यला वाईट वाटत आहे. या सगळ्याला आपणच कारणीभूत असल्याचं म्हणून चैतन्य स्वतःला दोष देणार असून, तडकाफडकी तिथून निघून जाणार आहे. चैतन्य कुठे गेला, म्हणून त्याला सगळेच शोधू लागणार आहेत. दुसरीकडे, नागराज आणि साक्षी महिपतला भेटायला जाऊन अर्जुन आणि चैतन्यची वकिली सनद रद्द होणार आहे, असं म्हणतात.



Source link